महाराष्ट्र शासन


आदिवासी विकास विभाग


एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पेण, जि.रायगड

ऑनलाइन आवेदन प्रवेश अर्ज शबरी घरकुल योजनेकरिता अर्ज स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करणेबाबत


केंद्रवर्ती अर्थसंकल्प (न्यूक्लिअस बजेट) योजना टिपणी

आदिवासी विकास विभाग शासन निर्णय दिनांक 21 जून 2013 अन्वये केंद्रवर्ती अर्थसंकल्प (न्यूक्लिअस बजेट) अंतर्गत ज्या योजना आदिवासींच्या विकासाच्या किंवा कल्याणाच्या दृष्टीने स्थळ काळानुसार आवश्यक आहेत व त्या योजनांचा समावेश अर्थसंकल्पात केलेला नाही अशा अभिनव स्वरूपाच्या स्थानिक महत्त्वाच्या योजना स्थानिक पातळीवर तातडीने आणि प्रभावीपणे कार्यान्वित करणे व त्याचा लाभ गरजू आदिवासींना प्रत्यक्ष मिळून देणे हि योजनेची प्रमुख संकल्पना आहे. .

स्थानिक गरजेवर आधारित नियमित योजनांतर्गत देण्यात येणाऱ्या लाभापेक्षा वेगळ्या संकल्पनेवर आधारित आर्थिक उत्पन्नवाढ ,प्रशिक्षण मानव साधन संपत्ती विकास व कल्याणात्मक योजने करिता एका व्यक्तीस /कुटुंबाना लाभाची आर्थिक मर्यादा जास्तीत जास्त रु 50000 /- व एका गटास सामूहिक प्रकल्पासाठी रुपये 750000/- पर्यंत शासनाने ठरवून दिलेल्या वर्गवारीनुसार सर्वसाधारण अनुसूचित जमातींच्या लाभार्थ्यास 85% व आदिम जमातीच्या लाभार्थ्यास 100% पर्यंत अर्थसहायय देण्यात येते . सदर योजने मध्ये 33% महिला ,विधवा , परितक्त्या ,निराधार महिला यांचा प्राधान्याने समावेश करण्यात येतो व दिव्यांगांना 2 टक्के प्राधान्य दिले जाते .योजनेचा मूळ उद्देश लक्षात घेता 2 गट पाडण्यात आले आहेत.
1. गट -अ उत्पन्न निर्मितीच्या किंवा उत्पन्न वाढीच्या योजना
2. गट -क मानव साधन संपत्ती विकासाच्या व आदिवासी कल्याणत्मक योजना
लाभार्थी पात्रतेचे निकष :-
1. लाभार्थी हा अनुसूचित जमातीचा असावा.
2. लाभार्थी दारिद्र्य रेषेखालचा असावा किंवा भारत सरकार शिष्यवृत्ती योजनेसाठी जी उत्पन्न तीच उत्पन्न मर्यादा व त्यामध्ये वेळोवेळी केंद्र सरकार बदल करेल ती मर्यादा या योजनेसाठी लागू राहील
3. लाभार्थ्या कडे आधार कार्ड असावे .
4. लाभर्त्याकडे जातीचा दाखला असावा
5. लाभार्थ्याने सदर योजनेचा अर्ज प्रकल्प कार्यालयात करावा

लाभार्थी निवड करताना प्रथम आदिम जमातीचे लाभार्थी /दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी /दिव्यांग अपंग लाभार्थी /33 टक्के महिला (विधवा ,परितक्त्या ,निराधार महिला ) याना प्राधान्याने योजनेचा लाभ दिला जाईल .
दिव्यांगांना 2 टक्के प्राधान्य दिले जाईल . नंतर जसे अर्ज प्राप्त होतील त्यातील कमी उत्पन्नापासून ते जास्त उत्पन्नापर्यंत यादी तयार करून त्यानुसार लाभ दिला जाईल .
आवश्यक ती कागदपत्रे ,अर्जाची जेष्ठता ,उपलब्ध निधी ,प्राप्त लक्षांक या निकषावर लाभार्थ्यांची निवड केली जाईल.

सोबत खालील प्रमाणे साक्षांकित कागदपत्रे जोडली आहेत
१.जातीचा दाखला
२. रेशनकार्ड
३. दारिद्र्य रेषेचा दाखला
४. यापूर्वी शासकीय /निमशासकीय विभागामार्फत लाभ न मिळाल्याबाबतचे हमीपत्र
५. उत्पन्नाचा दाखला
६. ग्रामसभा ठराव
७. शैक्षणिक पात्रता /मार्कशीट
८. रहिवाशी दाखला
९. शाळा सोडल्याचा दाखला
१०. ७/१२ चा उतारा
११. गटाची योजना असल्यास प्रत्येक लाभार्थ्यांचा वयक्तिक अर्ज भरणे (१० लाभार्थी)
१२. लाईट बिल
१३. आधार कार्ड
१४. बँक खाते क्रमांक /पासबुक