समाजातील आदिवासी घटक अत्यंत दुर्बल असून त्याचा आथिर्क ,शैक्षणिक , सामाजिक व सांस्कृतिक विकास करण्यासाठी आणि त्यांना सामाजिक आर्थिक इतर सर्व प्रकारचे शोषण या पासून संरक्षण देण्यास शासन कटिबंध असून त्यांच्या सर्वांगीण
विकासासाठी महाराष्ट्र शासनाने एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाची निर्मिती केलेली असून महाराष्ट्र राज्यात एकुण 30 आदिवासी प्रकल्प आहेत.
यापैकी प्रकल्प अधिकारी , एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प , पेण,जि.रायगड हे प्रकल्प कार्यालय कार्यरत आहे.
सदर प्रकल्पाचे कार्यक्षेत्र रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा समावेश आहे.
महाराष्ट्र राज्यात एकु ण भौगोलिक क्षेत्र 3,07,793 चौ.कि मी. आहे. त्यापैकी आदिवासी क्षेत्र 50,757 चौ.कि .मी. क्षेत्र आहे.
त्यापैकी रायगड जिल्ह्यातील आदिवासी क्षेत्र 449 चौ किमी क्षेत्र आहे.
रायगड जिल्ह्यामध्ये आदिवासी उपयोजना क्षेत्रात 134 गावांचा समावेश आहे. तसेच 1014 कातकरी वाद्य असुन त्यापैकी 82 कातकरवाड्या या आदिवासी उपयोजना क्षेत्रामध्ये (134 गावांमध्ये ) समाविष्ट असुन 932 कातकरवाड्या या आदिवासी उपयोजना बाह्यक्षेत्रामध्ये आहेत
Read more..